⭕दिव्यात अतिवृष्टीमुळे अडकलेल्या १३ जणांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले.
ठाणे ता २० ऑगस्ट : दिनांक १९/०८/२०२५ रोजी रात्रीच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार नाईकनगर चाळ, ओमकार नगर जवळ, संतोष नगर, दिवा (पू.), ठाणे या ठिकाणी पाणी भरल्याने काही व्यक्ती अडकल्या होत्या. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह उपस्थित होते. सदर घटनेत कोणालाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून एकूण १३- रहिवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांना तात्पुरत्या स्वरुपात त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

















